लॉक डाउन, दिवस २१
मी २१ दिवस हा लॉक डाउन ब्लॉग लिहायचे ठरवले होते त्याचा हा शेवटचा दिवस !
ह्या लॉक आऊट ने आपल्याला काय काय शिकवले ?
- माणसाने कितीही प्रगती केली तरी काही वेळा निसर्ग नक्की माणसावर मात करतो. ते करताना तो जात , धर्म , देश अशा कुठल्याच सीमा पाळत नाही.
-स्वछतेचे महत्व ! इतक्या वेळा कधी हात धुतले होते का कधी !! - स्वतः चा आणि सामाजिक अहंकार कमी झाला. सगळे घरी राहून घरातली सगळी कामे करायला लागली. मोठे नट आणि प्रतिष्ठित व्यक्ती पण घरातील काम करतानाचे फोटो share करू लागले. जे पूर्वी त्यांनी कधीच केले नसते.
- सगळे जण घरी जुने आणि नवे पदार्थ करायला लागले , ते share करायला लागले आणि आवडीने खायला लागले.
- माणसाला जगण्यासाठी किती कमी गोष्टींची गरज लागते ह्याची जाणीव नक्की झाली.
- आपण सरकारी कर्मचाऱ्यांना नेहमी नावे ठेवत आलो पण Corona च्या काळात त्यांचे महत्व आणि त्यांनी मनावर घेतले तर ते काम नक्की करू शकतात हे अनुभवले.
- जगण्याचे स्वातंत्र म्हणजे काय ? जे आपण गृहीत धरले आहे. लॉक डाउन मध्ये माणूस सोडून सर्व पक्षी आणि प्राणी जगण्याचे स्वातंत्र अनुभवत होते.
- Internet ने नसते तर लॉक डाउन मध्ये राहणे खूप अवघड झाले असते. Internet हि आता जीवनाश्यक गोष्ट झाली आहे.
अजून लॉक डाउन बाकी आहे. अजून पण नवीन गोष्टी नक्की कळतील.
सगळ्यांनी धैर्याने आणि संयमाने कॉरोना चा सामना करूया.
नवीन विषयावर नवीन ब्लॉग परत कधीतरी !!